वीर शिवा काशीद | Veer Shiva Kashid - Maratha Warrior

स्वामिनिष्ठ शिवा काशीद -Marathawarriour

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला आणि त्यानंतर पन्हाळा गड जिंकून घेतला याचं कारणांमुळे  विजापूरचा आदिलशहा खूपच चिडला.आणि आदिलशहाने शिवरायांचा विनाश करण्यासाठी सिद्दी जौहरला आणि अफजलखानाच्या मुलाला म्हणजेच फाजलखान यालाही पाठवले होते.त्यांनतर लगेच सिद्दी जौहरने पन्हाळाला  वेढा घातला.शिवरायांनी खूप प्रयत्न केला पण वेढातुन काही सुटतं नव्हते.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमीकाव्याने बाहेर पडण्याचे ठरवले .आणि शिवरायांनी  सिद्दी जौहरला निरोप पाठवला ''लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो'' हे ऐकून त्याला खुप आंनद झाला .त्यामुळे सिद्दी जौहर जलोश करत होता आणि सर्व सैनिकांना सुद्धा वाटले की किल्ला मिळाला आणि त्यामुळे वेढा कमी झाला होता.आणि तेव्हा शिवरायांनी गनिमीकावाचा अवलंब केला.

      

Veer shiva kashid

 पन्हाळगडावरून दोन पालख्या निघणार एका पालखीत शिवराय ती जाणार अवघड वाटेने  आणि दुसऱ्या पालखीत प्रती शिवाजी ती जाणार सिद्दी जौहरच्या नजरेत पडेल त्या अशा वाटेने तर प्रती शिवाजी कोण होणार?? प्रती शिवाजी होणं म्हणजे मृत्यूला सामोरे जाणे, तेव्हा एक बहादूर तरुण युवक तयार झाला. आणि तो दिसायलाही शिवाजी महाराजांसारखा होता.तो युवक म्हणजे शिवा काशीद ,त्यांचा व्यवसाय होता केशभूषा करणारा म्हणजेच न्हावी.शिवा काशीद यांचा जन्म पन्हाळा किल्ल्याजवळील नेबापुर या गावात झाला तो एक नाभिक कुटुंबात .शिवा काशीद खुप धाडसी आणि पराक्रमी युवक होता.आणि शिवा काशीद दिसायला शिवरायांच्या सारखेच होते.ठरल्या प्रमाणे दोन पालख्या निघाल्या शिवराय अवघड वाटेने गडावरून काही निवडक मावळ्यांसह बाहेर पडले आणि प्रती शिवराय (शिवा काशीद) यांनी शिवरायासारखे कपडे परिधान केले व जिरेटोप घेतला आणि निघाले नजरेस पडेल अशा वाटेने निघाले.रात्रीची वेळ होती आणि धो-धो पाऊस पडत होता.आणि दुसरी पालखी शत्रूच्या सहजपणे हाती लागली त्या वाटले की शिवरायांना पकडले गेले आणि त्यांचा जलोश सुरू झाला. त्यामुळे सिद्दी जौहर गाफिल राहिला आणि तिकडे पहिली पालखी विशाल गडाकडे धावत्या वेगाने जात होती.पण काही वेळाने त्याना समजले की हा खरा शिवाजी नसून खोटा शिवाजी आहे. तेव्हा सिद्दी जौहरने संतापून त्यांना ठार केले.शिवा काशीद अमर झाले.

जाणून बुजून मृत्यूला सामोरे जाणारे शिवा काशीद हे कोणत्याही लोभापायी किंवा लालचेपाई मृत्यूला सामोरे गेले नाही तर आपल्या राजांना वाचण्यासाठी आणि स्वराज्य राखण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दि१३ /१४ जुलै १६६० ला आपले स्वराज्याची बलिदान दिले .आणि एक स्वराज्याचा मावळा अमर झाला. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे रोखून धरली आणि छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप गडावर पोहोचले . पन बाजीप्रभू आणि काही सैनिकांनी सुद्धा स्वराज्यासाठी बलीदान दिले.बाजीप्रभू आणि वीर शिवा काशीद यांचे बलिदान कधीच विसरणार नाही . वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाच्या पायथ्याशी त्याची समाधी उभारण्यात आली आहे.

जोपर्यंत छत्रपती आहे हे स्वराज्य सुरक्षित आहे ,रयत सुखी आहे आणि स्वराज संकल्पना ही पूर्ण होणारच यासाठी एकच काय हजारो शिवा काशीद मारावयास तयार आहे.अशा वीर मावळ्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळून स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शतकापुढचे होते हे आज आपल्याला दिसून येते.

           जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):